मुख्य सामग्रीवर वगळा

अश्रू

     असं म्हणतात 'अश्रू ' हे दुबळ्या मनाचे प्रतीक असते. असेलही कदाचित. पण....

मानवाच्या भाव - भावनांचा विचार करता 'अश्रू ' या शब्दाला व त्यामागील भावनेला फार महत्त्व आहे. प्रत्येक माणसाचं मन सारखं नसतं. कठोर, मृदू, दयाळू, तटस्थ, खंबीर, हळवं... असे अनेक प्रकार.

      परमेश्वरानं माणसाच्या झोळीत सुखा बरोबर दुःखाचेही दान टाकले. अन ते दुःख व्यक्त करण्यासाठी अश्रुंची निर्मिती केली असावी. पण त्यातही स्री पुरुष भेदाभेद आढळतो. स्री अश्रुंना पटकन वाट मोकळी करुन देते. जसे आकाशातील काळ्याकुट्ट ढगांना गार हवेचा स्पर्श झाला की पावसाची जशी बरसात होते, अगदी तसे..... पुरुष मात्र पांढऱ्या ढगांसारखे असतात.....

 सुख जेव्हा आनंदाच्या अत्युच्य सीमा गाठते. तेव्हाही अश्रुंना आवर घालता येत नाही. आणि अति संवेदनशील प्रसंगी, वाईट घटनांच्या प्रसंगीही आवर घालणे अवघडच....

निसर्गातील मनमोहक दृश्यांनीही आनंदाश्रू तरळतात. उंचावरुन पडणारा नयनरम्य धबधबा, रानफुलांवर बागडणारी ती नाजूकशी रंगबेरंगी फुलपाखरे, वाऱ्याची नाजूकशी झुळूक, पक्ष्यांचा तो किलबिलाट, आकाशातील विविध छटा आणि बरंच काही...पाहिलं, मनापासून अनुभवलं की मनाच्या कोपऱ्यात आनंदाश्रू पाझरु लागतात.....

तसचं दुःखाचही आहे. घरातील इतर मंडळींनी दिलेलं दुःख, अपमान, कमी लेखनं, स्वार्थीपणा.. या अनुभवांवेळी दुःखाश्रू ओसंडून वाहतात. पण त्यांना लपवत ठेवावं लागतं... आजूबाजूच्या वाईट.. दुःखद घटनांना पाहून, अनुभवूनही दुःखाश्रुंची निर्मिती होते.

       अश्रुंची किंमत नव्हे तर मूल्य समजण्यासाठी समोरची व्यक्ती तेवढी संवेदनशील असावी लागते. भावनांचा आदर करणारी असावी लागते. डोळ्यातील अश्रू प्रेमाच्या स्पर्शाने पुसून आधार देणारे हात असावेत... मग कोणत्याही संकटांना, प्रसंगांना धैर्याने लढा देण्याची ताकद त्याच अश्रुंमध्ये परावर्तीत होते.

सध्याच्या युगात खोट्या अश्रुंचीही लाट आहे. त्यामुळे समोरच्याच्या भावना ह्या खऱ्या की खोट्या हेही कळत नाही. सर्व जगचं ढोंगी बनत चाललंय की काय? अशी शंका निर्माण होत आहे.. असो...

पण जगात अशीही काही लोक नक्कीच आहेत की,जे तुमच्या अश्रुंमागील भावना समजावून घेतील अन तुमच्या अश्रुंचेही मूल्य त्यांनी जाणलेलं असेल...

आणि या जगात.... आजूबाजूला असेही आपलेच म्हणवणारे महाभाग असतात की तुम्ही कितीही अश्रू ढाळा... त्यांना पाझर फुटत नाही.. मग भावना समजून घेणं अन अश्रुंचं मूल्य तर दूर..दूरचं....

सध्याच्या या कलियुगात तरी आपल्या अश्रुंचं मूल्य आपणचं जाणणं आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होऊन आपल्या भावनांची कदर करणं.. एवढचं आपल्या हाती आहे.


सौ. पद्मावती सुरेश सातपुते

शिरुर, पुणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतला गणेशोत्सव

  सौ. भारती सावंत, मुंबई किती गाऊ बाप्पा आज मी गोडवे तुझ्या महतीचे प्रतिक्षा तुझ्या आगमनाची मिळते पहाया दर्शन भक्तीचे   आमच्या बालपणी तुम्ही असेच थाटात , ढोल-ताशांच्या निनादात वाजत-गाजत यायचात. बाबा गणपती बाप्पाला बसवलेला पाट डोईवर घेत. आम्ही सारी मुले टाळ्यांचा गजर करत बाबांच्या पाठोपाठ चालत असू. नदी किनार्‍या वरून मिरवणूक काढून बाप्पा तुम्हाला घरापर्यंत आणले जाई. घरातील सुवासिनी तुमचे आणि बाबांचे पंचामृताने पाय धुऊन हळदी-कुंकू लावून , पायावर स्वस्तिक काढून जल्लोषात तुम्हाला घरात आणत आणि रंगरंगोटी , सजावट केलेल्या पाटावर तुम्हाला स्थानापन्न करत. फुलांच्या वर्षावात  ' गणपती बाप्पा मोरया ' करून आरोळी देत स्वागत करायचो. त्यावेळी आम्हा बालकांना खूप आनंद व्हायचा. पूर्ण अकरा दिवस भक्तिमय वातावरण नि तुमच्या जवळच आमचा मुक्काम.त्यामुळे ते अकरा दिवस अभ्यासाला पूर्ण सुट्टी. गणपतीची कामे दूर्वा , हराळी आणायला रोज रानात जायचं. एकवीस दुर्वांची जुडी तुमच्य...

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

  शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ , बालभारती , पुणे सदस्य व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल , सोलापूर                          महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र ,   पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोका...

मूल्य शिक्षण: काळाची गरज

  सुमन तिजोरे जि.प. प्राथ. शाळा वडाळा बहिरोबा ता.नेवासा , जि. अहमदनगर  मूल्यशिक्षण हा शब्द मूल्य आणि शिक्षण या दोन शब्दांचा मिळून तयार झाला आहे मूल्य हा मुळात संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ मोल असा आहे शिक्षण हा मराठी शब्द शिक्षा या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे शिक्षा हा शब्द शिक्ष् या धातूपासून म्हणजे मुलं रूपा पासून तयार झालेला आहे शिक्ष् म्हणजे ज्ञान मिळवणे उपदेश करणे यानुसार मूल्य शिक्षण म्हणजे मोलाची ज्ञान प्राप्ती किंवा मोलाचा उपदेश करणे मूल्यशिक्षला इंग्रजीत value Education म्हणतात या इंग्रजी शब्दाचे मूळ  valer  या लॅटिन शब्दात  आहे ,  valer चा अर्थ मूल्यवान असणे असा होतो तर Ed u cation या इंग्रजी शब्दाचे मूळ educatum, educere educare या लॕटीन शब्दांमध्ये Educcatum चा अर्थ शिकविणे असा होतो Educare  चा अर्थ उन्नयन  करणे हा आहे म्हणजे पालन करणे, पोषण करणे, संवर्धन करणे होय या उत्पत्ती वरून असे स्पष्ट होते की मूल्य शिक्षण म्हणजे मूल्यवान असण्यासाठी शिकविणे, उन्नयन करणे पालन करणे, पोषण करणे, व्यक्तीच्या शारीरिक मानसिक सामाजिक समायोजन यांन...