मुख्य सामग्रीवर वगळा

मूल्यवर्धन: काळाची गरज

 

आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.

 देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे.

"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..."

आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी.

परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची.

आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना.

प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो.

शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावना आहेत, त्याचेही विचारांचे विश्व असते. हे समजून घेऊन त्या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मूल्यसंस्काराची गरज आहे.

एखादे मूल शाळेत गप्प का असते? रोज उशिरा का येते? शांतच का बसते? मस्तीच का करते? रागावते का? अबोला का धरते? अभ्यास न करण्याचे कारण, उद्धट असण्याचे कारण, असुरक्षित वाटण्याचे कारण अशा आणि बऱ्याच का? ची उत्तरे शोधायची असतील तर मूल्यसंवर्धन या विषयाचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे.

 ६ ते १४ या वयोगटात विद्यार्थ्यांवर जे संस्कार केले जातात ते आजन्म त्याच्या मनावर कोरले जातात. याचाच फायदा घेऊन न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची रुजवण शाळापातळीवर करण्यासाठी विविध उपक्रमांचा आधार घेता येतो.

विद्यार्थ्यांसाठी काही वर्ग नियम तयार करता येतात जसे की शाळेत वेळेवर येणे, स्वतःबरोबर इतरांचा विचारांचाही आदर करणे, एकमेकांना सहकार्य करणे वगैरे आणि हे वर्ग नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक शिक्षा उदा. झाडांना पाणी शिंपणे, फळ्यावर सुविचार लिहिणे, मध्यान्ह भोजन वाढताना मुलांच्या रांगा करणे वगैरे देऊन आपण विद्यार्थ्यांवर मूल्यांचे संस्कार करू शकतो.

स्त्री -पुरुष समानता हे मूल्य शालेय जीवनात रुजवणे ही तर काळाची फार मोठी गरज आहे. यासाठी होऊन गेलेल्या आणि सध्या कार्यरत  असणाऱ्या महिलांच्या कार्याचा परिचय करून देणे, शाळा पातळीवर मुलगा-मुलगी असा भेद न करणे, सर्व कामांची विभागणी समान पातळीवर करणे, दोघांनाही समान स्थान व दर्जा देणे या गोष्टी घडल्या तर स्त्रियांविषयी आदर, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात बदल करणे शक्य होईल.

इतरांना समजून न घेण्याची, मनाविरुद्ध गोष्टी घडल्या कि स्वतःवर नियंत्रण न ठेवता समाजास नुकसान करणाऱ्या घटना करण्याची वृत्तीही या समाजात मूळ धरते आहे. या वृत्तीस आळा घालावयाचा असेल तर विद्यार्थीदशेतच मुलांच्या मनावर मूल्यांच्या बीजाचे रोपण करणे क्रमप्राप्त ठरेल.

आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.

काळाची गरज असणाऱ्या मूल्यांचा होत असलेला ऱ्हास आणि मूल्यसंवर्धनाची गरज लक्षात घेऊनच मूल्यवर्धक उपक्रम शाळापातळीवर अवलंबून देशाची भावी पिढी मूल्यसंस्कारयुक्त बनवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तेव्हाच "देश प्रगतिपथावर राहील व देशाचा संस्कारक्षम विकास होईल".


शिल्पा वनमाळी

जि.. शाळा

आगवन नवासाखरा

केंद्र सावटे, ता. डहाणू

जि. पालघर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

  शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ , बालभारती , पुणे सदस्य व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल , सोलापूर                          महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र ,   पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोका...

शैक्षणिक विकासामध्ये पालकांचे योगदान महत्त्वाचे

  श्रीमती खान तरन्नुम अब्बास जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर , ता. श्रीरामपूर, अहमदनगर मुलांच्या शैक्षणिक पायाभरणीत पालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असून , बदललेल्या काळात तर योगदानाचे संदर्भही बदलले आहेत. उंचावलेल्या आर्थिक स्तरांमुळे अनेक घरांत सांस्कृतिक , सामाजिक व तांत्रिक बदल झालेले आहेत. एखादे शहर विकसित होताना त्या शहराची भविष्याची आव्हाने पेलणारी पुढची पिढी विकसित करायची असेल तर ही पिढी घडविणाऱ्या पालकांच्या पालकत्वाची चिकित्सा होणे आवश्यक आहे. आपल्याला एखादी पदवी मिळविण्यासाठी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालयात जावे लागते , त्या विषयांच्या तासाला बसणे , क्रमिक पुस्तके वाचणे , संदर्भग्रंथ हाताळणे , परीक्षा देणे , ती उत्तीर्ण होणे हे सर्व टप्पे गाठावे लागतात. दुर्दैवाने पालक होण्यासाठी यापैकी काहीही करावे लागत नाही. शास्त्रशुद्ध अभ्यास , बालमानसशास्त्र , मेंदूच्या जडणघडणीचा प्रवास , लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रेरणा , नवनवीन ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमता , अनुकरणशीलता , संस्कार व मूल्य यांचा आयुष्यावर पडणारा प्रभाव , टीव्ही व मोबाइलचा ग्रहण...

मूल्य शिक्षण: काळाची गरज

  सुमन तिजोरे जि.प. प्राथ. शाळा वडाळा बहिरोबा ता.नेवासा , जि. अहमदनगर  मूल्यशिक्षण हा शब्द मूल्य आणि शिक्षण या दोन शब्दांचा मिळून तयार झाला आहे मूल्य हा मुळात संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ मोल असा आहे शिक्षण हा मराठी शब्द शिक्षा या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे शिक्षा हा शब्द शिक्ष् या धातूपासून म्हणजे मुलं रूपा पासून तयार झालेला आहे शिक्ष् म्हणजे ज्ञान मिळवणे उपदेश करणे यानुसार मूल्य शिक्षण म्हणजे मोलाची ज्ञान प्राप्ती किंवा मोलाचा उपदेश करणे मूल्यशिक्षला इंग्रजीत value Education म्हणतात या इंग्रजी शब्दाचे मूळ  valer  या लॅटिन शब्दात  आहे ,  valer चा अर्थ मूल्यवान असणे असा होतो तर Ed u cation या इंग्रजी शब्दाचे मूळ educatum, educere educare या लॕटीन शब्दांमध्ये Educcatum चा अर्थ शिकविणे असा होतो Educare  चा अर्थ उन्नयन  करणे हा आहे म्हणजे पालन करणे, पोषण करणे, संवर्धन करणे होय या उत्पत्ती वरून असे स्पष्ट होते की मूल्य शिक्षण म्हणजे मूल्यवान असण्यासाठी शिकविणे, उन्नयन करणे पालन करणे, पोषण करणे, व्यक्तीच्या शारीरिक मानसिक सामाजिक समायोजन यांन...