मुख्य सामग्रीवर वगळा

शैक्षणिक बातम्या : माझ्या नोकरीचा रौप्य महोत्सव

 


उषा कोष्टी, उपसंपादिका, मंगळवेढा, सोलापूर 

"मंजिल मिले ना मिले ऐ तो मुकदर की बात है | हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है | जिंदगी जख्मो से भरी है, वक्त को मरहम बनाना सिख लो | हारना तो एक दिन मौत से फिलहाल जिंदगी को जिना सिख लो |

     मी उषा कोष्टी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा घरनिकी येथे कार्यरत आहे. आज माझ्या शिक्षण क्षेत्रातील सेवेला २५ वर्ष पूर्ण झाली. खरच किती सहज बघता बघता हे दिवस निघून गेले समजलेच नाही. मला आज ही वाटत इतक्या लवकर पंचवीस वर्ष पूर्ण झाली. शिक्षक होणे हे भाग्यवान लोकांचेच काम आहे. स्वतःला सर्मपित करून प्रामाणिक पणे काम केल्यावर जगात कितीही अडथळे येवोत आपोआप दूर होतात. "थमकर ना बैठ उठान अभी बाकी है , जमी खत्म हुई तो क्या असमा अभी बाकी है" माझी मूळ नेमणूक ७/७/१९९७ आहे. आज ७/७/२०२२ ला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. आज माझ्या नोकरीचा रौप्य महोत्सव म्हटल तरी चालेल. मी ७ जुलैला पंचायत समिती मंगळवेढा या ठिकाणी हजर झाले. त्या वेळी अशी परिस्थिती होती की मला मंगळवेढ्यातील एकही गाव व शाळा माहित नव्हती. तरीही मला माझ्या घरापासून तीन किलो मीटर अंतरावरची शाळा मिळाली.  त्या शाळेचे नाव अगोदर शिंदे वस्ती नाव होते त्यानंतर लक्ष्मीनगर हे नाव त्या शाळेला देण्यात आले.  कुठली वस्ती शाळा कुठे आहे हे पण माहित नव्हत. सगळे म्हणाले जावा तुमच्या घरापासून जवळच आहे. एस टी मध्ये बसून त्या वस्ती शाळेजवळ उतरते. पण तिथ कुठ शाळाच दिसत नव्हती मला वाटल मी चुकीच्या ठिकाणी उतरले पण समोरच्या एका झोप डीतून मुलांचे आवाज येत होते म्हणून त्या ठिकाणी गेले तर खरच त्या झोपडीत शाळा भरली होती. तिथे शिकवणारे शिक्षक यांना मी माझी ऑर्डर दाखवली ते म्हणाले हिच शाळा आहे थोड्या वेळा पूरत तर डोळ्यासमोर अंधारच झाला कारण झोपडी एकच फळा व खुर्ची तर मोडकळलेल्या अवस्थेत आता दोघांनी या ठिकाणी कसे शिकवायचे हा मोठा प्रश्न पण ते शिक्षक फार समजूतदार होते व वयस्कर पण होते. त्यांनी मला सांगितल झोपडीत तू शिकव मी झाडाखाली शिकवतो म्हणाले.पहिल्या दिवसा पासून त्यांनी मला त्यांची मुलगीच मानली. त्यांनी मला जगायच कस शिकवल प्रत्येक गोष्टीच नियोजन करायला शिकवल. झोपडी मध्ये दोन वर्ष काढल्या नंतर १९९९ ला शाळेसाठी नविन इमारत मिळाली. अतिशय सुंदर इमारत बांधून तयार झाली होती त्यानंतर आम्ही रंगरंगोटी, वृक्षारोपन करून घेतले. या शाळेची गुणवत्ता नेहमीच १००% होती त्याच महत्त्वाच कारण म्हणजे मुले नेहमी १००% हजर असायची. जीव ओतून काम कस करायच हे या शाळेने शिकवल. त्यावेळी तालुक्यातील स्वच्छ सुंदर शाळा व गुणवता पूर्ण शाळा म्हणून नाव लैखिकला आली म्हणून या शाळेला २००२ या साली सोलापूर जिल्हा परीषदेच्या शिक्षणाधिकारी मा. सुमनताई शिंदे मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली. मॅडमला माझी शाळा खूप आवडली. त्यांनी आवर्जून सर्व मिटिंग मध्ये नेहमी शाळेचा उल्लेख करत. या शाळेतील कामाची दखल घेत २००३-०४ या साली जिल्हा परीषदेचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. शाळा स्वच्छ सुंदर व गुणवत्ता पूर्ण असल्यामुळे शाळेला शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास अभियान या अंतर्गत जिल्हातून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. या शाळेवर बारा वर्ष काम केले मी.अनेक चढ उताराला सामोरे जात या शाळेतून २००९ साली माझी बदली खोमनाळ या शाळेमध्ये झाली. ही मोठी शाळा होती नऊ शिक्षक कार्यरत होते. लक्ष्मीनगर पेक्षा ही खोमनाळ शाळेत काम करण्याची संधी मिळाली. या संधीच स्वतःच्या कर्तुत्वाने, , मेहनतीने सोन केल. या शाळेत माझ्या वर्गातील मुले प्रत्येक स्पर्धात चमकली त्यामध्ये वक्तृत्व निबंध कथाकथन क्रिडा सर्वच क्षेत्रात मुले चमकली. मोठ्या शाळेत काम करण्याची संधी मिळाली म्हणून एकच मनात इच्छा होती की काहीही झाल तरी शिष्यवृतीला मुले आणायची. पाचवीचा वर्ग माझ्याकडे आल्या नंतर त्या वर्षी मी  सुट्टी म्हणून काही घातली नाही. माझ्या बरोबर मुलांनी पण तेवढेच कष्ट घेतले आणि तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकली आणि त्याच बरोबर नवोदयला पण एका मुलीचा नंबर लागला. खरच कष्ट केल्यानंतर थोडी अपेक्षा केली तर त्या पेक्षा किती तरी पटीने जास्त मिळत हे मात्र खर.                                           "थमकर ना बैठ उठान अभी बाकी है                                        जमी खत्म हुई तो असमा अभी बाकी है"                                  आणि विशेष म्हणजे याच शाळेत मला जिल्हा परीषदेचा जनरल गरातून २०१७-१८ साली आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. कुणालाही वाटल नव्हत की एवढा मानाचा पुरस्कार मला मिळेल. पण प्रत्येकाला वाटत असत यश मिळणार नाही त्याच वेळी यश मिळवून दाखवण्यात सर्मथ्य असते. कुणी काहीही म्हणू देत आपण आपली जिद्द सोडायची नाही.                            

        जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढच जीवन जगताना स्पर्धक आणि  विरोधक  यांची गरज आहे स्पर्धक सतत आपल्याला गतीशील आणि क्रियाशिल बनवतात विरोधक कायम आपल्याला सर्तक आणि सावधान बनवितात.  हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात.  या दोघांना निर्माण करायला तुम्हांला कष्ट करावे लागत नाही. समाज फुकटात तुंम्हाला देऊन टाकतो. त्यांच्यावर चिडू नका त्यांचे कायम स्वागत करा त्यांच्या शिवाय तुमचे जगणे अधूरे आहे.

   सन २०१७-१८ चे विशेष म्हणजे या एका वर्षात जवळ जवळ २० ते २५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मला. आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले. खोमनाळ या शाळेत मी ९ वर्ष काम केले. तेथील सर्व शिक्षकांचा माझ्या प्रगती मध्ये मोलाचा वाटा आहे. नेहमी सर्वांनी मला प्रोत्साहन दिले. पालक विद्यार्थी व शिक्षक यांच एक अतूट नात या शाळेत निर्माण झाल. काम करण्याची चांगली संधी मला मिळाली अन केलेल्या कामाच चीज पण झाले.                                 त्यानंतर  सन-२०१८ साली माझी बदली मी सद्या कार्यरत असलेल्या शाळेत म्हणजे घरनिकी शाळेत झाली. ही पण शाळा खूप छान आहे . या तिन्ही शाळेत काम करून आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. कोणाचेही पाठबळ नसताना विविध स्तरातून अनेक पुरस्कार मिळाले आता पर्यत राज्यस्तर, जिल्हा स्तर व तालुका स्तर मधील ३५ पुरस्कारने सन्मानित केले. "उडान तो भरना है

चाहे कई बार गिरना पडे

सपनो को पुरा करना है

चाहे खुद से भी लडना पडे"

   तसेच अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये श्री संत दामाजी पतसंस्था संचालक पद, शिक्षक ध्येय उपसंपादिका, मराठीचे शिलेदार बहुउद्देशिय संस्था नागपूर यांचे सदस्या पद. आता पर्यंत मिळालेल्या यशामध्ये माझे सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी, माझे कुटुंब या सर्वाच्या सहकार्यामुळेच इथे पर्यत पोहचले आहे. असेच आपणा सर्वांचे  सहकार्या राहू दे .                         

"जमिनीवर राहून आकाशाला स्पर्श करता येतो फक्त हातात कर्तुत्वाचा पतंग हवा"


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मूल्यवर्धन: काळाची गरज

  आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.   देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...

साप्ताहिक शिक्षक ध्येय

  साप्ताहिक शिक्षक ध्येय वर्ष ३ रे; अंक २१ वा; १९ सप्टेंबर २०२२ सोमवार विशेष: राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक श्री. प्रकाश भिमराव हेडाऊ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ईटान 2, केंद्र मोहरणा, ता. लाखांदूर, जि. भंडारा यांचा पारितोषिक प्राप्त उपक्रम - बांधावरची शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम वाचायला विसरु नका... सोबत : ★ एकटेपणा : एक गंभीर समस्या ; प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, नागपूर ★ वाचन: काळाची गरज; श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार ★ मासिक पाळी: समज-गैरसमज; श्रीमती मीरा मनोहर टेके, औरंगाबाद ★ मास्तर ते सर : एक प्रवास ; सौ. भारती सावंत, मुंबई ★ शिक्षक:  समाज परिवर्तनाचे माध्यम; कु. प्रतिभा चांदुरकर, अमरावती ★ माझा शैक्षणिक प्रवास; साईनाथ फुसे, औरंगाबाद ★ इन सब 'में' कहा? प्रियदर्शनी मौदेकर, नागपूर ★ याशिवाय कविता, डिजिटल साक्षरता, नोकरीच्या जाहिराती, विद्यार्थ्यांची रंगविलेली चित्रे, रांगोळी, डिजिटलचा आविष्कार, नवी उमेद-नवी भरारी, नवी आशा - नवी दिशा, मेंदूला खुराक, थोडं हसा बरं, ग्राफीटी, सप्ताहातील फोटो, बालचित्रकला, नोकरीचा राजमार्ग आदी अनेक वाचनीय सदरे... _★ शिक्षक ध्येय वाचायला विसरु नका.....

अश्रू

       असं म्हणतात ' अश्रू ' हे दुबळ्या मनाचे प्रतीक असते. असेलही कदाचित. पण.... मानवाच्या भाव - भावनांचा विचार करता ' अश्रू ' या शब्दाला व त्यामागील भावनेला फार महत्त्व आहे. प्रत्येक माणसाचं मन सारखं नसतं. कठोर , मृदू , दयाळू , तटस्थ , खंबीर , हळवं... असे अनेक प्रकार.       परमेश्वरानं माणसाच्या झोळीत सुखा बरोबर दुःखाचेही दान टाकले. अन ते दुःख व्यक्त करण्यासाठी अश्रुंची निर्मिती केली असावी. पण त्यातही स्री पुरुष भेदाभेद आढळतो. स्री अश्रुंना पटकन वाट मोकळी करुन देते. जसे आकाशातील काळ्याकुट्ट ढगांना गार हवेचा स्पर्श झाला की पावसाची जशी बरसात होते , अगदी तसे..... पुरुष मात्र पांढऱ्या ढगांसारखे असतात.....   सुख जेव्हा आनंदाच्या अत्युच्य सीमा गाठते. तेव्हाही अश्रुंना आवर घालता येत नाही. आणि अति संवेदनशील प्रसंगी , वाईट घटनांच्या प्रसंगीही आवर घालणे अवघडच.... निसर्गातील मनमोहक दृश्यांनीही आनंदाश्रू तरळतात. उंचावरुन पडणारा नयनरम्य धबधबा , रानफुलांवर बागडणारी ती नाजूकशी रंगबेरंगी फुलपाखरे , वाऱ्याची नाजूकशी झुळूक , पक्ष्यांचा तो किलबिला...