मुख्य सामग्रीवर वगळा

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

 


शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व

अभ्यासक्रम संशोधन  मंडळ, बालभारती, पुणे सदस्य
व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल
, सोलापूर


                    महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र,  पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोकांनाच अशोकाच्या शिलालेखात "रास्टीक" म्हटलेले असून त्याचेच संस्कृत रूप "राष्ट्रीक" असे झाले. मौर्य सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात बौद्ध परिषदेचे आयोजन केले होते. याचा वृत्तांत आपणास श्रीलंकेत लिहिलेल्या महावंश या पाली ग्रंथात आढळतो त्यात महारठ्ठ असा येणारा उल्लेख हा महाराष्ट्राचाच असावा असे वाटते. महाराष्ट्र बद्दलचा महाराष्ट्र असा उल्लेख आढळणारा पुरातत्वीय लिखित पुरावा गुप्‍त व वाकाटक काळातील आहे हेरण या मध्य प्रदेशात असणाऱ्या ठिकाणी इसवीसन ३६५ सालचा सत्य नागाचा संस्कृत शिलालेख प्राप्त झाला त्यात तो स्वतः ला महाराष्ट्र 'प्रमुखेत' असा करतो. महाराष्ट्राच्या भूभागात साठी महारथी महारथी असे नावे वापरली जात होती. भरुची वातशहन भरत मुनी या ग्रंथात महाराष्ट्र हे नाव आढळते. नाणेघाटातील शिलालेखात इसवी सन पूर्व २०७ मध्ये मराहठी चा राजा वेदश्री होता असा उल्लेख आढळतो. रवी किर्ती च्या लेखात चालुक्य वंशीय दुसरा पुलकेशी हा तीन महाराष्ट्रावर राज्य करीत होता असा उल्लेख आढळतो. सातवाहन कालखंडातील शिलालेखात आपणास   'महारठी ' 'महारठीनी ' असे नाव आढळते.. पुढे याच प्राकृत रूपांतर महारठ्ठ झाले आणि पुढे महाराष्ट्र झाले असे काही विद्वान समजतात. महानुभावांच्या लीळाचरित्रात या प्रदेशांचे व येथील लोकांचे ' 'महाराष्ट्रीय विद्या आणि पुरुष' असे गुणगाण केलेले

आढळते.

        राजाराम शास्त्री भागवत यांच्या मते संस्कृत नाटकांमध्ये येणारा मरहट्ट जन वाचक शब्द मह्वठा या शब्दाची प्रकृती दिसते. वि का राजवाडे यांच्या मते महाराष्ट्र शब्दाची विभक्ती रट्ट या शब्दावरून झाली या शब्दाचे संस्कृत रूप म्हणजे राष्ट्रिक. म्हणजेच राष्ट्रात अधिकाराचे काम करणारा व्यक्ती होय वर्णाने क्षत्रिय व पिढीजात पेशाने असा या राष्ट्रात आमचा किंवा रस्त्यांचा दर्जा असे हजार-बाराशे वर्षांपूर्वी राष्ट्रीय काहून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रिक किंवा असे म्हणत. मोठा किंवा महत्तर प्रांत म्हणजेच मोठे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय.

        एखाद्या प्रदेशाच्या सामाजिक सांस्कृतिक व राजकीय अस्मितेच्या जडणघडणीत विविध घटक जबाबदार असतात भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषा या परिमाणाच्या आधारावर राज्यांची निर्मिती केली गेली महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यामागे मराठी भाषा हा प्रमुख आधार होता. भाषा फक्त सध्या पण करत नाही तर संस्कृती संवर्धन व जतन ही करते. भाषा हे समाजाचे वेगळेपण प्रभावीपणे अधोरेखित करते    भारतासारख्या बहुभाषिक बहुधर्मीय भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने मोठ्या असणाऱ्या देशांची प्रशासनाच्या सोयीसाठी ज्यावेळी राज्याची निर्मिती करायचे ठरले त्यावेळेस भाषा हा एक

 आधार ठरविण्यात आला.

        महाराष्ट्र निर्मितीचे काही प्रमुख ठळक मुद्दे पुढील प्रमाणे...

  १) बंगालची फाळणी रद्द झाल्यानंतर १९११ मध्ये " मराठी भाषा बोलणार्‍यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी"  न चि केळकर त्यांनी आपले मत मांडले. इसवी सन १९४६ पासून मराठी भाषिक राज्याची मागणी 'संयुक्त महाराष्ट्र चळवळी' च्या माध्यमातून  सुरू झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निर्णय  १२ मे १९४६ रोजीच्या बेळगाव येथील साहित्य संमेलनात झाला.

२) संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेकरिता महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै १९४६ मध्ये महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये मुंबई मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा गोमंत अशा मराठी भाषिकांचा समावेश करण्यात यावा असा ठराव पारित करण्यात आला.

३) १० डिसेंबर १९४८ रोजी दार आयु गाणे आपला अहवालात असे सादर केले की भाषेच्या आधारे प्रांतिक रचना ही भारताच्या राष्ट्रीय हितसंबंध आस इष्ट नाही आणि आवश्यक की नाही. यासारख्या अनेक कारणांमुळे अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाले आणि पुढे जे व्ही पी समिती नेमण्यात आली.

४) जवाहरलाल पंडित नेहरू, वल्लभ भाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या अध्यक्षरा वरून JVP जवप ही त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली

१ एप्रिल १९४९ रोजी या समितीने दार कमिशन प्रमाणेच आपला अहवाल सादर केला त्यामुळे पुन्हा नाराजीचा सूर सर्वत्र पसरला. त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आचार्य अत्रे यांनी मांडला व तो बहुमताने मंजूर झाला.

५) मराठी भाषेत मुंबई महाराष्ट्र वराड आणि नागपूर प्रदेशात काँग्रेस समित्यांची स्थापना झाली ताम्हणकर यांनी महाराष्ट्राचे तीन विभाग या लेखात मराठी भाषिकांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे असे सांगितले तर विनोबा भावे यांनीही महाराष्ट्रधर्म या लेखातून या कल्पनेचा पुरस्कार केला.

६)८ ऑगस्ट च्या अकोला करारानुसार महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि महाविदर्भ असे दोन उपप्रांतपाल असावेत असे सुचविण्यात आले.

७) २९ सप्टेंबर १९५३ रोजीचा नागपुर करारा च्या संयुक्त महाराष्ट्र स्थापन करारावर मराठवाडा विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.  " महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू " असे शंकरराव देव म्हणाले.

७) २२ डिसेंबर १९५३ रोजी राज्य पुनर्रचना समितीची घोषणा करण्यात आली या समितीला फाजल अली समिती असेही म्हटले जाते. पंडित हृदयनाथ कुंझरू आणि केएम पणीकर हे या समितीचे सदस्य होते. यामध्ये मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी या आयोगाने शिफारस केली होती.

८) ८ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. १९५६ ते १९६० या दरम्यान संयुक्त महाराष्ट्र समितीने अनेक कार्य केली.

९) द्विभाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती साठी केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी प्रयत्न केले महाराष्ट्र काँग्रेस मध्ये सत्तेसाठी संघर्ष अटीतटी ला पोहोचला पण गुजरातच्या पाठिंब्यावर यशवंतराव चव्हाण यांनी मुंबईच्या विधिमंडळाचे नेतृत्व मिळवले व १ नोव्हेंबर १९५६ रोजी मोठ्या द्विभाषिक राज्याची स्थापना होऊन यशवंतराव चव्हाण द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले व शेवटचे मुख्यमंत्री झाले.

१०) द्रीभाषिक राज्याचां प्रयोग शक्य नाही हे केंद्रीय नेतृत्वाला यशवंतराव चव्हाण यांनी व्यवस्थितरीत्या समजावून दिले त्यानुसार गुजरात व महाराष्ट्र अशी स्वतंत्र एक भाषी राज्य निर्माण करावी यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती आणि महागुजरात परिषद यांनी आपले कार्य केले.

        ४ डिसेंबर १९५९ रोजी विभा शकाचे विभाजन करण्याचा ठराव केला.

११) पंडित नेहरू नि मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला संमती दर्शवली त्यानुसार मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती हिरवा कंदील दाखविल्यावर संसदेत मुंबई राज्य पुनर्रचना विधेयक १९६० ला संमत करण्यात आले. १मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

१ मे हा दिवस कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो..

आपल्या सर्वांना महाराष्ट्र निर्मिती दिवसाच्या व कामगार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणीतला गणेशोत्सव

  सौ. भारती सावंत, मुंबई किती गाऊ बाप्पा आज मी गोडवे तुझ्या महतीचे प्रतिक्षा तुझ्या आगमनाची मिळते पहाया दर्शन भक्तीचे   आमच्या बालपणी तुम्ही असेच थाटात , ढोल-ताशांच्या निनादात वाजत-गाजत यायचात. बाबा गणपती बाप्पाला बसवलेला पाट डोईवर घेत. आम्ही सारी मुले टाळ्यांचा गजर करत बाबांच्या पाठोपाठ चालत असू. नदी किनार्‍या वरून मिरवणूक काढून बाप्पा तुम्हाला घरापर्यंत आणले जाई. घरातील सुवासिनी तुमचे आणि बाबांचे पंचामृताने पाय धुऊन हळदी-कुंकू लावून , पायावर स्वस्तिक काढून जल्लोषात तुम्हाला घरात आणत आणि रंगरंगोटी , सजावट केलेल्या पाटावर तुम्हाला स्थानापन्न करत. फुलांच्या वर्षावात  ' गणपती बाप्पा मोरया ' करून आरोळी देत स्वागत करायचो. त्यावेळी आम्हा बालकांना खूप आनंद व्हायचा. पूर्ण अकरा दिवस भक्तिमय वातावरण नि तुमच्या जवळच आमचा मुक्काम.त्यामुळे ते अकरा दिवस अभ्यासाला पूर्ण सुट्टी. गणपतीची कामे दूर्वा , हराळी आणायला रोज रानात जायचं. एकवीस दुर्वांची जुडी तुमच्य...

मूल्य शिक्षण: काळाची गरज

  सुमन तिजोरे जि.प. प्राथ. शाळा वडाळा बहिरोबा ता.नेवासा , जि. अहमदनगर  मूल्यशिक्षण हा शब्द मूल्य आणि शिक्षण या दोन शब्दांचा मिळून तयार झाला आहे मूल्य हा मुळात संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ मोल असा आहे शिक्षण हा मराठी शब्द शिक्षा या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे शिक्षा हा शब्द शिक्ष् या धातूपासून म्हणजे मुलं रूपा पासून तयार झालेला आहे शिक्ष् म्हणजे ज्ञान मिळवणे उपदेश करणे यानुसार मूल्य शिक्षण म्हणजे मोलाची ज्ञान प्राप्ती किंवा मोलाचा उपदेश करणे मूल्यशिक्षला इंग्रजीत value Education म्हणतात या इंग्रजी शब्दाचे मूळ  valer  या लॅटिन शब्दात  आहे ,  valer चा अर्थ मूल्यवान असणे असा होतो तर Ed u cation या इंग्रजी शब्दाचे मूळ educatum, educere educare या लॕटीन शब्दांमध्ये Educcatum चा अर्थ शिकविणे असा होतो Educare  चा अर्थ उन्नयन  करणे हा आहे म्हणजे पालन करणे, पोषण करणे, संवर्धन करणे होय या उत्पत्ती वरून असे स्पष्ट होते की मूल्य शिक्षण म्हणजे मूल्यवान असण्यासाठी शिकविणे, उन्नयन करणे पालन करणे, पोषण करणे, व्यक्तीच्या शारीरिक मानसिक सामाजिक समायोजन यांन...