मुख्य सामग्रीवर वगळा

व्यक्तिमत्व विकास

 


सौ नूतन विनोद कामळे-मुळणकर

ता. नांदगाव, जि. नाशिक


उठावदार व्यक्तिमत्वाचे व्यक्ति ची संगत सगळयांनाच आवडत असते जर त्यांच्यात  चांगले नैतिक गुण असतील, तर व्यक्ति माणुस म्हणूण सगळयांनाच हवहवसं वाटते.


व्यक्तिमत्व हा शब्द सामान्यपणे मनुष्य प्राण्याच्या संदर्भात वापरला जातो. दिसणे,  वेशभूषा, वर्तन ह्यांच्या साहाय्याने  दुस-यावर  प्रभाव पाडणे.  हा प्रभाव जितका अधिक तितके ते व्यक्तिमत्व प्रभावशाली मानले जाते. व्यक्तिचा ज्याप्रमाणे प्रभाव पडतो त्याचप्रमाणे समाजावर ही प्रभाव पडत असतो तर बघू व्यक्तिमत्व म्हणजे काय?


प्रत्येक व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाची परिभाषा प्रत्येक व्यक्ति आप-आपल्या मतानुसार मांडणार  परंतु  मानसशास्त्रांच्या दृष्टिकोणातून बघितल्यास कळते, की शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासातून जे व्यक्तिदेह घडत असते त्यास व्यक्तिमत्व म्हणतात. व्यक्तिच्या सुविकसित व्यक्तिमत्वामध्ये आचार, विचार आणि भावना या तिन्हींचा मेळ असतो.  व्यक्तिच्या व्यक्तिमत्वात तिचे बाह्यरूप म्हणजेच शरीर रचना, मानसिक गुणांसारखे आंतरीक घटक आणि परिस्थितीशी समायोजन करण्याची पद्धती  यांचा समावेश होतो किंवा आपण असं ही म्हणू शकतो, की अंतर्मुख-बहिर्मुख यांच्यात विकास घडवून स्वतःला समाजासमोर सादर करण्याची कला किंवा पद्धत म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय.

व्यक्ति हा स्वतःच व्यक्तित्व स्वतः घडवितो त्यानंतर  त्याचे रूपांतर व्यक्तिमत्वात करित असतो. समाजात आपली छाप पाडण्यासाठी व्यक्तिमत्व विकास करणे खूप गरजेचे आहे. 


आपल्या अवती-भवतीच्या  लोकांचाही परिणाम आपल्या प्रगतीवर, आयुष्यावर होत असतो  म्हणूणच  चांगल्या विचारांचे व्यक्तिमत्व अर्जित केलेल्या व्यक्ति सोबत च जवळकी साधावी चांगले गुण,  चांगली संगत जीवनात समाविष्ट करावे.  आपले विचार, कर्म आपले भाग्य लिहीत असतात.  ह्या  सगळया  गोष्टींचा विचार विनिमय करूनच त्यानुसार व्यक्तिमत्वाच विकास घडवावा. 


प्रत्येक व्यक्ति ही निसर्गाची अद्भुत कलाकृती आहे,  त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वतःला कमी लेखण्यापेक्षा स्वतःमध्ये सातत्यने सुधार कसा होईल याचा प्रयत्न केलाच पाहिजे. या सृष्टितील रचलेल्या प्रत्येक जीवात्मा मध्ये त्रृटी आणि उणिवा आहेत कुणीच श्रेष्ठ नाही ही बाब लक्षात ठेवून स्वतःची कल्पनाशक्ति  जागृत करा आणि ती वाढवा.  तुमचे चांगले उठावदार व्यक्तिमत्व सगळया विश्र्वाला दिसू दया. 



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मूल्यवर्धन: काळाची गरज

  आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.   देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

  शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ , बालभारती , पुणे सदस्य व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल , सोलापूर                          महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र ,   पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोका...

व्यवसाय मार्गदर्शन : मोबाईल टेक्निशियन

     मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर बदलत आहे. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईल धारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन , जोडणी , वितरण , विक्री पश्चात सेवा आदींच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी ठरणारे अखंड सुरु राहणारे क्षेत्र आहे. म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सद्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाही. डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने , सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो.      आज मोबाईल सर्वांना गरजेचा झाला आहे....