मुख्य सामग्रीवर वगळा

सुखाची सर...

 


श्रीमती. सविता दिलीप वाघूळदे

जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर ओझर खुर्द,
ता.जामनेर, जि. जळगांव




        मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं... ह्या सुंदर ओळी कधीच न ऐकलेली किंवा कधीच न गुणगुणलेली व्यक्ती मिळणं तसं दुर्मिळच!!! "सुख" या वलयाभोवती सारं विश्व घिरट्या घालतंय अगदी अनंत काळापासून...किती आटापिटा, किती ते प्रयत्न, किती ती स्पर्धा...एवढं सगळं करून ही कुणाला गवसलंय का हे सुखं...? अनुत्तरित प्रश्न, जो भेडसावतोय प्रत्येकाला, तसाच मलाही, सुखाची तशी विशिष्ट व्याख्या असूच शकत नाही, कारण सुख मानण्याची ज्याची त्याची मापदंड वेगळी.

          माझ्यासाठी ह्या सुखाची व्याख्या नेमकी काय! असा प्रश्न मला जेव्हा जेव्हा पडतो, तेव्हा तेव्हा भरभरून उत्तरं मनात पिंगा घालतात....निरभ्र आकाश, स्वच्छ उजाडलेला दिवस, मंद वाऱ्याची झुळूक हे ही सुखच माझ्यासाठी, पक्ष्यांची मंजुळ किलबिल कानावर येणं, घरकाम करतांना आवडीची भावगीतं, चित्रपट गीतं ऐकणं, मेहनतीने केलेला स्वयंपाक, त्याचा घरातील सर्वांनी कौतुक करून आस्वाद घेणं, दिवसभरातील घरकामांमधून स्वतःसाठी थोडा का होईना वेळ मिळणं... अहाहा!!! हे सुख नाही तर आणखी काय....!

          माझ्या बाळाचे गोड शब्द कानी ऐकू येत अख्खा दिवस अगदी आनंदात जाणं, त्याच्या लडीवाळात दिवस-रात्र न्हाऊन निघणं, हे सुखच!!! सुखाच्या परिसीमा आपण विस्तीर्ण करून ठेवल्या की मग त्या सुखासाठी फक्त झुरणं आपल्या हाती असतं, म्हणून छोट्या छोट्या, सहज वाटणाऱ्या, मनाला अमर्याद आनंद देऊन जाणाऱ्या गोष्टींमध्ये सुख मानलं ना तर तेच सुख आपल्या पायाशी लोळण घालत...बघा अनुभवून....घ्या शोध ह्या "सुखाच्या सरींचा" आणि भिजून जा, त्या सरींमध्ये, चिंब चिंब, नखशिखान्त...!

 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मूल्यवर्धन: काळाची गरज

  आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.   देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...

साप्ताहिक शिक्षक ध्येय

  साप्ताहिक शिक्षक ध्येय वर्ष ३ रे; अंक २१ वा; १९ सप्टेंबर २०२२ सोमवार विशेष: राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक श्री. प्रकाश भिमराव हेडाऊ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ईटान 2, केंद्र मोहरणा, ता. लाखांदूर, जि. भंडारा यांचा पारितोषिक प्राप्त उपक्रम - बांधावरची शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम वाचायला विसरु नका... सोबत : ★ एकटेपणा : एक गंभीर समस्या ; प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, नागपूर ★ वाचन: काळाची गरज; श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार ★ मासिक पाळी: समज-गैरसमज; श्रीमती मीरा मनोहर टेके, औरंगाबाद ★ मास्तर ते सर : एक प्रवास ; सौ. भारती सावंत, मुंबई ★ शिक्षक:  समाज परिवर्तनाचे माध्यम; कु. प्रतिभा चांदुरकर, अमरावती ★ माझा शैक्षणिक प्रवास; साईनाथ फुसे, औरंगाबाद ★ इन सब 'में' कहा? प्रियदर्शनी मौदेकर, नागपूर ★ याशिवाय कविता, डिजिटल साक्षरता, नोकरीच्या जाहिराती, विद्यार्थ्यांची रंगविलेली चित्रे, रांगोळी, डिजिटलचा आविष्कार, नवी उमेद-नवी भरारी, नवी आशा - नवी दिशा, मेंदूला खुराक, थोडं हसा बरं, ग्राफीटी, सप्ताहातील फोटो, बालचित्रकला, नोकरीचा राजमार्ग आदी अनेक वाचनीय सदरे... _★ शिक्षक ध्येय वाचायला विसरु नका.....

अश्रू

       असं म्हणतात ' अश्रू ' हे दुबळ्या मनाचे प्रतीक असते. असेलही कदाचित. पण.... मानवाच्या भाव - भावनांचा विचार करता ' अश्रू ' या शब्दाला व त्यामागील भावनेला फार महत्त्व आहे. प्रत्येक माणसाचं मन सारखं नसतं. कठोर , मृदू , दयाळू , तटस्थ , खंबीर , हळवं... असे अनेक प्रकार.       परमेश्वरानं माणसाच्या झोळीत सुखा बरोबर दुःखाचेही दान टाकले. अन ते दुःख व्यक्त करण्यासाठी अश्रुंची निर्मिती केली असावी. पण त्यातही स्री पुरुष भेदाभेद आढळतो. स्री अश्रुंना पटकन वाट मोकळी करुन देते. जसे आकाशातील काळ्याकुट्ट ढगांना गार हवेचा स्पर्श झाला की पावसाची जशी बरसात होते , अगदी तसे..... पुरुष मात्र पांढऱ्या ढगांसारखे असतात.....   सुख जेव्हा आनंदाच्या अत्युच्य सीमा गाठते. तेव्हाही अश्रुंना आवर घालता येत नाही. आणि अति संवेदनशील प्रसंगी , वाईट घटनांच्या प्रसंगीही आवर घालणे अवघडच.... निसर्गातील मनमोहक दृश्यांनीही आनंदाश्रू तरळतात. उंचावरुन पडणारा नयनरम्य धबधबा , रानफुलांवर बागडणारी ती नाजूकशी रंगबेरंगी फुलपाखरे , वाऱ्याची नाजूकशी झुळूक , पक्ष्यांचा तो किलबिला...