मुख्य सामग्रीवर वगळा

अशी पाखरे येती आणिक...

 


आकांक्षा अनिल गोसावी
(मुख्याध्यापिका)

धारावी ट्रान्झिट कँम्प
म. न. पा. मराठी शाळा

 

विद्यार्थ्याच्या पायाचे ऑपरेशन होऊन एके दिवशी हा विद्यार्थी स्वतःच्या पायांनी चालत जेव्हा शाळेत आला, त्यावेळी त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे ते भाव आणि डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू याच्या वर्णनाला शब्दच नव्हते. त्या मालीने त्यावेळी आमच्या मुख्याध्यापकांचे कोटी कोटी आभार मानले.

 

आजपासून २० वर्षांपूर्वीचा शैक्षणिक काळ आठवला तर आजच्या इतक्या शैक्षणिक  सोयी-सुविधा, सवलती त्यावेळी नव्हत्या. आज शिक्षण क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आहे, अपंग समावेशित शिक्षणाच्या माध्यमातून आज  दिव्यांग - अपंग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थांप्रमाणेच हव्या त्या शाळेत प्रवेश घेता येतो आणि शिक्षण प्रवाहात दाखल होता येते. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासनाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. पण २० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. या विद्यार्थ्यांसाठी  फारशा सोयी सुविधा उपलब्ध नसतानाही महानगरपालिकेतील एका शाळेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि  पायाने अपंग असलेल्या अशा एका विद्यार्थ्याला त्याची आई कमरेवर उचलून घेऊन शाळेत आणून बसवीत असे. शाळेची इमारत तीन मजल्यांची असून तळाला हॉल असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वर्ग व्यवस्था पहिल्या मजल्यापासून सुरू होत होती. त्यावेळी शाळेला रॅम्प  किंवा अपंग विद्यार्थ्यांसाठी चाकाची खुर्ची अशा सोयी उपलब्नव्हत्या.

 

 

या मुलाची आई जिद्दीने व चिकाटीने दररोज नियमितपणे मुलाला कमरेवर उचलून घेऊन शाळेत पहिल्या मजल्यावरील वर्गात आणून बसवी आणि शाळा सुटल्यावर घेऊन जात असे. हे फक्त एक आईच करू शकत होती. आणि तेही कोणत्याही प्रकारची तक्रार न करता. हा विद्यार्थीही तसाच गुणी व हुशार होता. त्यामुळे शिक्षकांचा व मुख्याध्यापकांचाही तो आवडता होता. त्यावेळेच्या मुख्याध्यापक मॅडम यांनी या विद्यार्थ्यांच्या पायावर वैद्यकीय उपचार  होऊन तो  स्वतःच्या पायावर चालेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. महानगरपालिकेच्या अशा विद्यार्थ्यांना याबाबत  महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेतून कोणत्या प्रकारचा उपचार करता येईल याचा पाठपुरावा करून शेवटी त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले. विद्यार्थ्याच्या पायाचे ऑपरेशन होऊन एके दिवशी हा विद्यार्थी स्वतःच्या पायांनी चालत जेव्हा शाळेत आला, त्यावेळी त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे ते भाव आणि डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू याच्या वर्णनाला शब्दच नव्हते. त्या माउलीने त्यावेळी आमच्या मुख्याध्यापकांचे कोटी कोटी आभार मानले.

 महानगरपालिकेच्या शाळेत दाखल होताना पायाने अपंग असलेल्या विद्यार्थ्याला सातवी पास होऊन पुढील शिक्षणासाठी शाळा सोडून जाताना स्वतःचे अपंगत्व नाहीसे करून खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या आमच्या मुख्याध्यापकांमधील कनवाळूपणा, शाळेतला विद्यार्थी हा केवळ आपला विद्यार्थी नसून आपलं मुल आहे या भावनेने त्याच्या भल्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे काय असते हे त्यावेळी आम्हा शिक्षकांना उमगलं. या विद्यार्थ्याने ही अश्रू भरल्या नयनांनी शाळेच्या शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकांचा निरोप घेतला.

त्यानंतर दहा वर्षांनी हाच विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटायला येतो. त्याचे उच्च शिक्षण पूर्ण होऊन नोकरीनिमित्त अमेरिकेला जाण्याची संधी त्याला उपलब्ध झाली होती. आपल्या शिक्षकांना भेटावे व आपल्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद घ्यावे यासाठीच तो त्यांना भेटायला आला होता.

कठीण परिश्रम करून दुबळ्या शारीरिक परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणारे असे विद्यार्थी आठवले की मन अभिमानाने भरून येते.

 

आणि मग आपोआपच मन गुणगुणू लागते .   

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती..


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मूल्यवर्धन: काळाची गरज

  आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.   देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...

साप्ताहिक शिक्षक ध्येय

  साप्ताहिक शिक्षक ध्येय वर्ष ३ रे; अंक २१ वा; १९ सप्टेंबर २०२२ सोमवार विशेष: राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक श्री. प्रकाश भिमराव हेडाऊ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ईटान 2, केंद्र मोहरणा, ता. लाखांदूर, जि. भंडारा यांचा पारितोषिक प्राप्त उपक्रम - बांधावरची शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम वाचायला विसरु नका... सोबत : ★ एकटेपणा : एक गंभीर समस्या ; प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, नागपूर ★ वाचन: काळाची गरज; श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार ★ मासिक पाळी: समज-गैरसमज; श्रीमती मीरा मनोहर टेके, औरंगाबाद ★ मास्तर ते सर : एक प्रवास ; सौ. भारती सावंत, मुंबई ★ शिक्षक:  समाज परिवर्तनाचे माध्यम; कु. प्रतिभा चांदुरकर, अमरावती ★ माझा शैक्षणिक प्रवास; साईनाथ फुसे, औरंगाबाद ★ इन सब 'में' कहा? प्रियदर्शनी मौदेकर, नागपूर ★ याशिवाय कविता, डिजिटल साक्षरता, नोकरीच्या जाहिराती, विद्यार्थ्यांची रंगविलेली चित्रे, रांगोळी, डिजिटलचा आविष्कार, नवी उमेद-नवी भरारी, नवी आशा - नवी दिशा, मेंदूला खुराक, थोडं हसा बरं, ग्राफीटी, सप्ताहातील फोटो, बालचित्रकला, नोकरीचा राजमार्ग आदी अनेक वाचनीय सदरे... _★ शिक्षक ध्येय वाचायला विसरु नका.....

अश्रू

       असं म्हणतात ' अश्रू ' हे दुबळ्या मनाचे प्रतीक असते. असेलही कदाचित. पण.... मानवाच्या भाव - भावनांचा विचार करता ' अश्रू ' या शब्दाला व त्यामागील भावनेला फार महत्त्व आहे. प्रत्येक माणसाचं मन सारखं नसतं. कठोर , मृदू , दयाळू , तटस्थ , खंबीर , हळवं... असे अनेक प्रकार.       परमेश्वरानं माणसाच्या झोळीत सुखा बरोबर दुःखाचेही दान टाकले. अन ते दुःख व्यक्त करण्यासाठी अश्रुंची निर्मिती केली असावी. पण त्यातही स्री पुरुष भेदाभेद आढळतो. स्री अश्रुंना पटकन वाट मोकळी करुन देते. जसे आकाशातील काळ्याकुट्ट ढगांना गार हवेचा स्पर्श झाला की पावसाची जशी बरसात होते , अगदी तसे..... पुरुष मात्र पांढऱ्या ढगांसारखे असतात.....   सुख जेव्हा आनंदाच्या अत्युच्य सीमा गाठते. तेव्हाही अश्रुंना आवर घालता येत नाही. आणि अति संवेदनशील प्रसंगी , वाईट घटनांच्या प्रसंगीही आवर घालणे अवघडच.... निसर्गातील मनमोहक दृश्यांनीही आनंदाश्रू तरळतात. उंचावरुन पडणारा नयनरम्य धबधबा , रानफुलांवर बागडणारी ती नाजूकशी रंगबेरंगी फुलपाखरे , वाऱ्याची नाजूकशी झुळूक , पक्ष्यांचा तो किलबिला...